घाटसावळी -आनंद लांडे
बीड जिल्ह्याला सध्या भयानक दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने व महाराष्ट्र शासनाने बीड जिल्हा हा दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने केंद्राने दुष्काळी भागाचा आढावा घेण्यासाठी पथक बीडला दुष्काळाची पाहणी करण्याकरता आले असून आज बीड तालुक्यातील मौजे पोखरी मैंदा येथील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय पथकाने भेट दिली यावेळी परिषदेच्या लघु पाटबंधारे म्हातारा म्हसोबा तलावाची पाहणी करण्यात आली व काशिनाथ साहेबराव काळे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन कापसाच्या शेताची पाहणी केली
यावेळी केंद्रीय पथकासमोर विविध मुद्दे मांडण्यात आले गेल्या वर्षाच्या तुलनेत एकरी नव्वद टक्के उत्पन्नात घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोजना कराव्यात असे सांगण्यात आले यावेळी केंद्रीय पथकाला उत्पादन व खर्च दोन्ही मुद्दे सांगितले एकरी खर्च 20 ते 25 हजार रुपये येतो व या वर्षाचे उत्पादन एकरी एक कुंटल कापूस झाला आहे व त्यालाही भाव सहा ते सात हजार रुपये मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे यावेळी केंद्रीय पथकाने दुष्काळी अनुदान व तात्पुरत्या उपयोजना न करता शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी दुष्काळ निवारण करण्यासाठी ठोक योजना आणाव्यात असे या भागातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे यावेळी केंद्रीय पथकाने सविस्तर माहिती लिहून घेऊन कायमच्या उपयोजना करण्यासाठी आम्ही केंद्राकडे सूचना करू असं सांगण्यात आले व शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढलेला असून हा विमा तात्काळ वाटप करण्यासाठी विमा कंपनीला सूचना द्याव्या व हे हे दुष्काळाचे संकट आलेले निवडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने यावर लक्ष देऊन निवारण करण्यात यावा अशी येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे यावेळी बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सिओ एच.डी.एम. मॅडम तहसीलदार हजारे साहेब व बीड तालुका कृषी अधिकारी भूजल सर्वेक्षण अधिकारी उप अभियंता पाणीपुरवठा व मंडळ अधिकारी घाटसावळी पशुवर्धन अधिकारी तलाठी सज्जा पोखरी मैंदा तसेच मैंदा पोकरी घाटसावळी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते