बीड(रिपोर्टर): वीज वितरण कंपनीवरील भार कमी करण्यासाठी सौर उर्जेेची वीज वापरावी, असे आवाहन शासनाच्या वतीने सातत्याने केले जाते. सौर ऊर्जेसाठी शासन अनुदानही देत आहे. अनेक शेतकर्यांनी सौर ऊर्जेचे पॅनल घेण्यासाठी कोटेशन भरले मात्र त्याचे अप्रुल वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून वेळेवर मिळत नसल्याने अप्रुलसाठी शेतकर्यांची अडवणूक होऊ लागली. आज सकाळी जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी अप्रुलसाठी कार्यालयात होते. संबंधित अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याने शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे.
वाढती लोकसंख्या पाहता आणि यांत्रिकीकरण वाढल्याने विजेची मागणी वाढली. विजेवरचा भार कमी करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे उपकरणे वापरण्याबाबत शासनाकडून आवाहन केले जात आहे. विद्युत पंपही सौर ऊर्जेवर चालतात. सौर ऊर्जेवरील विद्युत पंपासाठी शासन अनुदान देत आहे, अनेक शेतकर्यांनी पंप खरेदी करण्यासाठी महावितरणकडे कोटेशन भरले. कोटेशन भरल्यानंतर कार्यालयाकडून अप्रुल दिले जाते. मात्र अप्रुल वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्यांची गैरसोय होऊ लागली. आज शंभर ते दीडशे शेतकरी अप्रुलसाठी कार्यालयात ठाण मांडून बसले होते. अप्रुल देणारे कर्मचारी शेतकर्यांची का अडवणूक करत आहेत?असा प्रश्न होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून शेतकर्यांना वेळेवर अप्रुल देण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान संबंधित गावचे लाईनमनही सर्वे करण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक करत असल्याचे अनेक शेतकर्यांच्या तक्रारी आहेत.