केज (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून शालेय विद्यार्थिनीची छेड काढली जातेयय याबाबतच्या दोन तक्रारी केज पोलिसांना दिल्या जातात, पोलीस या प्रकरणी कुठलीही कारवाई करत नाहीत. अखेर छेड काढणार्याकडून विद्यार्थिनीला पुन्हा-पुन्हा सतावले जात असल्याने सरशेवटी दहावीची विद्यार्थिनी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करते. ही घटना घडल्यानंतरही केज पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाही, शेवटी पिडितेचे नातेवाईक एसपींना थेट भ्रमणध्वनीवरून माहिती देतात, एसपी संबंधित केज पोलीस ठाण्याच्या पीआयशी संवाद साधतात. त्यानंतर दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होतात. दुर्दैव, पोलीसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर मुलीचा जीव वाचला असता. या प्रकरणात दोषी पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
याबाबत अधिक असे की, केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील गेल्या वर्षी नववी वगार्त शिणार्या मुलीला 19 वर्षीय अक्षय भगवान काळे हा सातत्याने त्रास देत होता. मोबाईल नंबरवर बोल म्हून हट्ट करत होता. संबंधित मुलीने हा प्रकार घरी सांगितला. घरच्यांनी सदरचे प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. त्याचबरोबर त्या मुलाच्या नातेवाईकांना याची माहिती दिली गेली मात्र मुलाने त्रास देणे सोडले नाही. अखेर मुलीला चिंचोलीमाळीच्या शाळेतून काढून केजच्या शाळेमध्ये दाखल करण्यात आले. तिथेही सदरचा मुलगा हा त्रास देत होता. दरम्यानच्या काळात दोन वेळा पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. मात्र केज पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून सदरील दहावीत शिकणार्या मुलीने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडल्यानंतरही केज पोलीस या प्रकरणी गांभीर्याने घेत नव्हते. शेवटी एसपींच्या आदेशाने दोषीविरोदात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केज पोलिसात सुरू हाते. पोलिसांची निष्क्रीयता आणि दुर्लक्षपणामुळे सदरील मुलीला जीव गमवावा लागला. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.









