पश्चिम महाराष्ट्रात 4 हजार भाव दिला
जातो मग मराठवाड्यात 3 हजार का नाही?
बीड (रिपोर्टर) वाढत्या महागाईमुळे शेतीचा खर्च वाढला. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात उसाचं चांगलं उत्पादन निघू लागलं. उत्पादनानुसार उसाला योग्य भाव मिळ नसून येत्या हंगामात उसाला 3 हजार रुपये भाव न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाई गंगाभीषण थावरे यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रात चार हजार रुपये भाव दिला जातो मग मराठवाड्यात तीन हजार का दिला जात नाही, असा प्रश्न थावरे यांनी उपस्थित केला.
यावर्षी उसाला अडीच हजार, सत्तावीसशे रुपये भाव देऊ, असे आश्वासन बीड जिल्ह्यातील अनेक कारखानदारांनी दिले होते, मात्र कारखानदारांनी 2200 ते 2400 पर्यंतच (पान 7 वर)
भाव दिला. मराठवाड्यातल्या उसाला किमान तीन हजार रुपये तरी भाव मिळायला हवा, पण येथील साखर कारखानदार शेतकर्यांची पिळवणूक करतात. त्यांना योग्य तो भाव देत नाहीत. वाढत्या महागाईमुळे शेती परवडत नाही. खत, मजूर, नांगरणी, खुरपणी यासह इतर सर्वच खर्च वाढलेले आहेत. हा वाढीव खर्च पाहता मराठवाड्यातील शेतकर्यांना किमान तीन हजार रुपये भाव मिळायला हवा, पुढील हंगामात तीन हजार रुपये भाव न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाई गंगाभीषण थावरे यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार चार हजार रुपये भाव देतात मग मराठवाड्यातील कारकानदारांना तीन हजाराचा भाव द्यायला काय झालं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.