बीड (रिपोर्टर) जम्मू -कश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत केलेला आरोप अत्यंत गंभीर असून या आरोपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही उत्तर दिलेले नाही. याबाबत काँग्रेस पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शर्म करो मोदीजी… शर्म करो… या आशयाचे बॅनर लावून काँग्रेसने भाजपचा निषेध केला. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगण्यात आले. भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का नाकारण्यात आली? यासह अन्य प्रश्न उपस्थित करत मोदी यांचा काँग्रेस पक्षाने आज जाहीर निषेध केला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी राजेसाहेब देशमुख, रविंद्र दळवी, राहूल सोनवणे, पशूपती दांगट, प्रवीण शेप, गणेश राऊत, संभाजी जाधव, हनुमंत मोरे, रमेश सानप, गणेश बजगुडे, महेश बेद्रे, श्रीनिवास बेद्रे, विष्णू मस्के, गणेश करांडे, अमोल पाठक, राम शेळके, परवेज कुरेशी, गणेश जवकर, शामसुंदर जाधव, मोहसीन भाई, अमजद कुरेशी, गोविंद साठे, किरण आजबकर, हनुमंत घोडके, नारायण होके, दत्ता काबले, आपरोज तांबोळी सह आदींची उपस्थिती होती.