- नवी दिल्ली (वृत्तसेवा) देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये १०.१५ वाजता घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.
तत्पूर्वी त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. तिथे त्यांनी रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर नवीन राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले असून यानंतर त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतिपदी झाली.
प्राथमिक शिक्षणही स्वप्नवत
राष्ट्रपती म्हणाल्या, मी जिथून आले त्या समुदायात, भागात अगदी प्राथमिक शिक्षण हेही स्वप्नवत आहे. गरीब, मागासलेल्याचे प्रतिबिंब माझ्यात दिसते. मी भारतातील तरुण आणि महिलांना खात्री देतो की या पदावर काम करताना त्यांच्या हितासाठी तत्पर असेल.देशहितासाठी कार्य करु
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, नव्या रस्त्यावर चालणार्या भारतासाठी प्रगतीचा संकल्प करीत आहे. मी समस्त देशवासीयांना विश्वास देते की, या पदावर काम करताना मला देशहित महत्वाचे असेल. भारताच्या आजवरच्या सर्व राष्ट्रपतींनी हे पद भुषवले आहे.