शेतकर्या विरोधात तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- भुईमुगाचे डुक्कर, हरणांनी नुकसान करू नये म्हणून एका शेतकर्याने तारेच्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडला. सदरील ठिकाणी चित्रे पकडण्यासाठी जालना जिल्ह्यातील एक तरूण आला असता. त्यांचा या कंपाऊंडला चिटकून मृत्यू झाला. ही घटना तलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजापुर शिवारात घडली. दोषी शेतकर्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष्मण गोविंद जाधव यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली हेाती. भुईमुगाचे वन्य प्राण्यांनी नुकसान करू नये म्हणुन भुईमुगा भोवती असलेल्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडला. सदरील ठिकाणी योगेश उत्तम कचरे (वय 22 रा.भोगगाव ता.घनसांगवी जि.जालना) हा तरूण चित्रे पकडण्यासाठी आला होता. त्याला तारेच्या कंपाऊंडला विद्युत पुरवठा असल्याचे माहित नसल्याने त्याला वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या प्रकरणी तलवाडा ठाण्याचे मोहसीन शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
000
बेपत्ता मृतदेह विहरीत आढळला
बीड (रिपोर्टर)ः- बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी विहरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
गोरख मोहन शिंगणे रा.तलवडा ता.गेवराई हा तरुण बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही. सदरील या तरुणाचा मृतदेह एका विहरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या प्रकरणाचा अधिक तपास तलवडा पोलीस करत आहे.







