किल्लेधारूर (रिपोर्टर) धारूर शहरांमध्ये आज संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने महिलांनी निषेध मोर्चा काढत तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. हा मोर्चा धारूर नगर परिषदेपासून काशिनाथ चौक, शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
बिलकीस बानो यांच्यावर अत्याचार करणार्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणार्या 11 जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या, हजरत मोहम्मद (स.) यांच्याविषयी प्रत्येक वेळी अपमानजनक टिप्पणी करणार्यांविरुध्द कडक कारवाई करून त्यासाठी कायदा लागू करावा, भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणान्या अत्याचाराविरुध्द कडक कायदा करावा. या प्रमुख मागण्यांसाठी धारूर मध्ये संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद ते तहसील कार्यालय महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हक के लिए लढना तो बगावत नहीं होती अशी हाक देत महिलांनी एल्गार केला. या निषेध मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.