पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक
आष्टी तहसिल कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह महिलांचे आंदोलन
आष्टी (रिपोर्टर) पिंपळगाव दाणी येथील विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते परंतु जोरदार झालेल्या पावसाने पूल रस्ता वाहून गेला आहे. नष्ट झाल्याने आता जाता येत नाही तसेच पाटाने मेहकरीला जाण्यासाठी ही आनंदवाडी मार्गे 6 किलोमीटर अंतर आहे या रस्त्याने देखील चिखल असल्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही रस्ता अभावी शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. आमचा रस्ता पुल झाला च पाहाजे आमच्या मागण्या मान्य करा,शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ, महिलांनी आज दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.भर उन्हात विद्यार्थी उपोषणास बसले आहेत.
तालुक्यातील पिंपळगाव दाणी गावातील 50 मुले असून शाळेपासून वंचित राहत आहेत तसेच गावचा तालुक्याशी असलेल्या संपर्क तुटलेला आहे फक्त रस्ता नसणे हेच मूळ कारण आहे. यामुळे लवकरात लवकर रस्ता करून द्यावा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले तरी आमच्या गावाला साधा जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता नाही यामुळे सुवर्ण वर्षानिमित्त आमच्या गावासाठी चांगला रस्ता देण्यात यावा तसेच पुल ही तात्काळ करण्यात यावा हीच शाळेतील मुलांची महिलांची ग्रामस्थांची मागणी आहे यासाठी तहसील कार्यालयासमोर शाळेतील मुले महिला ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.