वडवणी (रिपोर्टर):- पिक विमा सह नुकसान भरपाई अनुदान देण्यासाठी सरकार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उशीर होत आहे.यासह अन्य मागण्यासाठी वडवणी शहरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास किसान सभेच्या वतीने ट्रँक्टर मोर्चा काढत मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकविला आहे. तर ट्रँक्टरमध्ये शेतकरी राँम्प गाण वाजवित या मोर्चाने वडवणीकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
सदरील मोर्चा आज दुपारी 12 वा. वडवणी शहरातील विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक तहसिल कार्यालयावर धडकला आहे. यामध्ये शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळवून देणारा कायदा करण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्यात, वीज विधायक वापस घ्यावे, घोषित अतिवृष्टी अनुदान तातडीने वाटप करावे, पीक नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा वितरित करा व वितरणात पारदर्शकता आणण्यात यावी, वन्य प्राण्यांपासून शेती वाचविण्यासाठी शंभर टक्के अनुदानित कुंपणाची सुविधा द्यावी, वडवणी तालुक्यातील देवडी व साळिंबा फिटरच्या शेतकर्यांना दिवसा आठ तास योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यासाठी सदरील मोर्चा किसान सभेच्या वतीने काढण्यात आला आहे.तर या मोर्चात तब्बल 25 ट्रँक्टरचा सहभाग होता.तर या ट्रँक्टरमध्ये शेतकरी राँम्प आवाजात गीत तयार करुन मोर्चात गीत वाजविण्यात आले आहे. तर यावेळी उपस्थित किसान सभेच्या कार्यकर्त्यासह किसान पुत्रानी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली असून या मोर्चाने वडवणीकरांचे मात्र विशेष लक्ष वेधून घेतले आहे.या मागण्याचे निवेदन वडवणी तहसिल प्रशासनानाला देण्यात आले आहे.