मुंबई (रिपोर्टर) शेतकर्यांचे काय झाले? जुनी पेन्शन योजना, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण यासर्व विषयांच्या संदर्भात शिंदे गटाला काही देणेघेणे नाही. हे सत्तापिपासू आहेत, ही जुमला पार्टी आहे, त्यांनी येणारी निवडणूक भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जिंकायची आहे, त्यांच्या व्हिपला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे आ. भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. जाधव म्हणाले की, आमचे मुख्यमंत्रीपद गेले, 40 आमदार, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्या केसेस झाल्या, असे कित्येक व्हिप बघितले. देवेंद्र फडणविसांवर कुणाचा विश्वास नाही, राजकारणात वैचारिक विरोधक असू शकतात, या विचाराला फडणवीस यांनी खराब केले. त्यांनी आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना राजकारणातून संपवल्याचे जाधव यांनी म्हटले.