आष्टी (रिपोर्टर) नवरात्रीच्या काळात भाविक 9 दिवसाचा उपवास पाळतात. उपवासादरम्यान प्रामुख्याने भगर खाल्ली जाते. मात्र, हिच भगर भाविकांच्या जीवावर उठली असल्याचे चित्र आष्टी तालुक्यात पाहायला मिळत आहे.खरेदी केलेल्या भगरीतून देवळाली येथे बुधवारी 5 लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवार दि.26 सप्टेंबरपासुन नवरात्रीचे उपवास सुरू झाले. तालुक्यातील देवळाली येथील 5 भाविकांनी फराळासाठी आपल्या गावातील दुकानातून भगर विक्रीसाठी आलेली खरेदी केली होती.या भगरीच्या भाकरी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी व घबराट आदी त्रास जाणवू लागला. राधा सखाराम खाडे देवळाली,शोभा विष्णू तांदळे,पवन विष्णु तांदळे, प्रशांत विष्णु तांदळे, विष्णु बाबूराव तांदळे,व घाटापिंपरी येथील शालिनी कांबळे यांनी बुधवारी सकाळी गावातुन भगर आणुन भाकरी करून सकाळी दहा अकराच्या सुमारास खाल्ली.पण नंतर थोड्या वेळात लोकांना चक्कर,मळमळ,सुरू झाल्याने त्यांना घाटापिंपरी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या भगरीतुन विषबाधा होऊ लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.