70 ताब्यात, अनेकांवर गुन्हे; जिल्हा पोलीस अधिक्षक तळठोकून; शहरात तणावपूर्ण शांतता
केज(रिपोर्टर): किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात दोन गट आमने- सामने भिडले एकमेकांवर तुफान दगडफेक केली. एकमेकांवर हल्ला होत असतांना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. स्वत: पोलिस या घटनेत फिर्यादी झाले असून आतापर्यंत 70 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रात्री 11.30 च्या दम्यान केज शहरातील लोंढे गल्ली परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेहरकर यांच्यासह 17 अधिकारी आणि स्थानिक पोलिस कर्मचारी शहरात तळ कोठून आहेत. (पान 7 वर…)
केश शहरातील लोंढे गल्ली परिसरात रात्री 11.30 वाजता किरकोळ वाद झाल्याने दोन गट आमने-सामने आले. अफवा पसरविल्याने मोठा जमाव जमल्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये काही लोक जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले दरम्यान स्वत: पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी मोठा फोजफाटा घेवून घटनास्थळ गाठले. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना किरकोळा लाटीजार्च करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांनी यश आले. मात्र फिर्याद देण्यासाठी दोन्ही गटातील एकहीजन पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन नमूद प्रकरणामध्ये गुन्हा नोंद केला. सदर गून्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील 70 इसमांना ताब्यात घेतले. तसेच इतर 50 ते 60 लोकांवर भादवि कलम 143, 147, 148, 149, 153 (अ) 323, 324, 295, 336, 308, 427, 160, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये असल्यामुळे केज शहरात सध्या तणावपूर्व शांतता आहे. रात्रीपासून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ, तलवाडा पोलिस ठाण्याचे प्रमुख शंकर वाघमोडे, केजचे ठाणेप्रमुख बाळासाहेब पवार, यांच्यासह उपविभागीय अधिकारी शरद झोडगे, तहसिलदार मेंडगे, ना. तहसिलदार सचिन देशमुख यांच्यासह 15 अधिकारी अन् 150 कर्मचारी केज शहरात तळ ठोकून आहेत.
अफवा पसरविणार्यांवर आमची करडी नजर-एसपी ठाकुर
अफवा पसरविल्यामुळे केजमध्ये दोन गटात राडा झाला. यामध्ये दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. 70 जणांना त्याब्यातही घेतले आहे. शहरा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुक यावर आमची कटाक्षाने करडी नजर आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवण्याचे काम नागरिकांनी करू नये. कोणत्याही घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, जेणेकरून समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहील.