बीड (रिपोर्टर)ः- बोगस अपंग प्रमाणपत्राच्या जोरावर बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या निलंबनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिली आहे मात्र बोगस अपंग प्रमाणपत्राच्या जोरावर ज्या शिक्षकांनी नोकरी मिळविली आहे अशा शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत खंडपिठाने मुभा असल्याचे सांगितल्यामुळे बीड जिल्हा शिक्षण विभागात ज्या शिक्षकांनी अपंगाचे बोगस प्रमाणपत्र लावून नोकरी मिळविली, त्यांच्यावर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे विश्वसनिय सुत्रांनी रिपोर्टरला सांगितले. त्यामुळे त्या बोगस शिक्षकांवर निलंबन अथवा अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार पाहावयास मिळते. हे निलंबन अथवा बडतर्फी येत्या आठवडाभरात होणार आहे.
बीड जिल्हा परिषदेने प्राथमीक शिक्षक बदली प्रकीयेत ऑनलाईन अर्ज करतांना अपंगाचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र या अपंग प्रमाणपत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांना शंका आल्याने त्यांनी सर्व अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसपणा आढळून आला. या सर्व शिक्षकांना निलंबीत केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातच्या खंडपिठाने याला स्थगिती दिली असली तरीही बदली किंवा इतर लाभ सोडता बोगस अपंग प्रमाणपत्रावर ज्यांनी शिक्षकांची नोकरी मिळवली आहे. अशा शिक्षकांना निलंबन अथवा बडतर्फ अशी मोठी कारवाई होण्याची शक्कता विश्वसनीय सुत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेतील 336 शिक्षकांनी ऑनलाईन बदली प्रकियेत अंपगाचे प्रमाणपत्र जोडून आपणाला आहे त्या ठिकाणीच नियुक्ती कायम करावी व सोयीचे ठिकाणी मिळावे म्हणून मागणी केली होती. मात्र या अपंग प्रमाणपत्रावर खोट असावी अशी शंका जिल्हा परिषद प्रशासनाला आल्याने त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. याही ठिकाणी हे सर्व शिक्षक बोगस अपंग असल्याचे शिक्षक आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी शिक्षकांना निलंबीत केले होते. निलंबीत शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आपल्या निलंबनाला आवाहन दिले होते. औरंगाबाद खंडपिठाने बदली किंवा इतर लाभ घेतला असेल तर या शिक्षकांकडून माफी नामा लिहून घेवून त्यांचे निलंबन रद्द करावे असे आदेश दिले होते. असे असतांनाच जे शिक्षक बोगस अपंग प्रमाणपत्रावर नियुक्त लागले आहे अशा शिक्षकांवर कारवाई करणयाची मुभा जिल्हा परिषद प्रशासनाने दिली होती. त्यानुसार आज ज्या बोगस शिक्षकाने लाभ घेतला आहे. अशा शिक्षकांचा माफीनामा लिहून घेवून त्यांना इतरत्र पदस्थापना देण्यात येणर आहे. मात्र ज्या शिक्षकांनी नोकरीत अपंग प्रमाणपत्र मिळवले आहे. अशा शिक्षकांवर निलंबन अथवा सेवेतून बडतर्फ अशी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र सध्यातरी यांच्यावर बडतर्फीची कारवाई ही मुबईतील जे.जे. रुग्णालयातून तपासणी करुन आल्यानंतरच होईल तोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होवू शकते.