अंबाजोगाई (रिपोर्टर) शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा तात्काळ भराव्यात या मागणीसाठी अंबाजोगाईत डीवायएफआय संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक संघटीत होत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व डीवायएफआयचे तालुकाध्यक्ष देवीदास जाधव यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्या जागा तात्काळ भरून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी द्यावी, खासगीकरण, कंत्राटीकरण तत्काळ बंद करावे, परीक्षेसाठी भरमसाठ आकारी जाणारे परीक्षा शुल्क शंभर रुपयांपेक्षा जास्त आकारू नये, बेरोजगार तरुणांना दर महा 500 रुपये बेरोजगार भत्ता सुरू करावा, व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण मार्फत मिळणार्या योजना पारदर्शकपणे राबवाव्यात यासह विविध माण्यांसाठी डीवायएफआयच्या वतीने अंबाजोगाईत मोठ्या संख्येने युवक एकत्र आले होते. हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यायावर धडकल्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी सुहास चंदनशिव, देवीदास जाधव, प्रशांत मस्के, रोहीत देशमुख, सचीन टिळक, जगन्नाथ पाटोळे, अतुल सोमवंशी, राहुल भावठाणकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.