आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी गावावर शोककळा
आष्टी ( रिपोर्टर ):- नवराञ उत्सव उद्या सोमवार दि.२६ सप्टेंबर पासून सुरू होत असून,भाविक भक्त वेगवेगळ्या प्रकारे देवीची उपासना करतात. याचाच एक भाग म्हणून नऊ दिवस अखंड ज्योती तेवत ठेवली जाते. प्रत्येक गावातून युवक तुळजापूर, माहूरगड,मोहटादेवी याठिकाणी जाऊन ज्योत आणत आहेत.आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील तरूण ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जात असतांना येरमाळा जवळ मोटार सायकलवर असलेल्या दोन तरूणांचे अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.यामध्ये गावचे उपसरपंच व आरोग्य सेवकाचा समावेश आहे.त्यांच्या निधनाने पाटण सांगवी गावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील सांगवी पाटण येथील अमोल सुरेशराव खिलारे उपसरपंच वय ३८ व महेश भास्करराव भोसले आरोग्य सेवक वय ३१ असे अपघातात मयत तरूणांचे नाव आहेत.गेल्या दहा वर्षापासून ज्योत आणण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून,प्रत्येक गावातील तरूण ज्योत आणण्यासाठी आप-आपल्या गावातील मंडळ एकञ येत घटस्थापनेच्या आगोदर तुळजापूर, मोहटादेवी,माहूरगड आशा देवींचे असलेले ठाणे तिथून ज्योत आणून घटस्थापना करतात.दि.२४ शनिवारी आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील मंडळ तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी निघाले.पहाटे तीन च्या दरम्यान येरमाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर अमोल खिलासे व महेश भोसले गाडीच्या पाठीमागे आपल्या मोटारसायकलवर चालले होते.त्यांच्या मोटार सायकलला अपघात होऊन खिलारे अन् भोसले जागीच मृत पावले. त्यांच्या निधनाने सांगवी पाटण या गावावर दुखा;चा डोंगर कोसळला आहे.मयतांवर आज रविवारी सकाळी ९ वा.सांगवी पाटण येथे शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.